कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन
पहाटे फिरायला जाणाऱ्या एका नागरिकास कंटेनरने चिरडले. या घटनेत संबधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. कऱ्हाड मधील दत्त चौकात आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात सुनील आनंदा माने (वय ५२, रा. गुरूवार पेठ, भाजी मंडई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दशरथ सुर्यवंशी (रा. बुधवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. जखमींवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे दोघेही रोज सकाळी फिरायला जात असे. आज फिरायला गेल्यावर दत्त चौकात विट्याकडे जाणाऱ्या कंटेनरने त्या दोघांनाही चिरडले. त्यात माने यांच्या पोट व डोक्यावरून कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दशरथ यांच्या पायावरून कंटेनर गेल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस व वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्वरित नातेवाईकांशी संपर्क केला. जखमीला तोपर्यंत नागरिकांनी सह्याद्री रुग्णालयात दाखल केले होते. पोलिस अपघातस्थळी पोचल्यानंतर त्यांची ओळख पटली. माने यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी कुटीर रूग्णालयात नेला आहे.