काश्मीरमध्ये चकमकीत भारताचे पाच जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात हलमतपोरा येथे सुरु असलेल्या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. जम्मू- काश्मीर पोलीस दलाचे दोन आणि लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर, दोन पोलीस जखमी झाले आहेत.

काल रात्रीपासून कुपवाडा येथे सुरु असलेल्या चकमकीत चार दहशतवादीही ठार झाले आहेत.

जवानांच्या स्पेशल आॅपरेशन ग्रुपवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली. अशी माहीती संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली आहे.

कारवाईत लष्कराचे पॅरा कमांडोही सहभागी झाले आहेत. या भागात सात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल आणि एसओजीने संयुक्तपणे शोध मोहिम सुरु केली होती.