दिल्लीतून दिग्विजय सिंह आयटम घेऊन आले: भाजपा नेता बरळला
भोपाळ : वृत्तसंस्था
नर्मदा यात्रा करणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपच्या एका खासदाराने जळजळीत जळजळीत टीका केली आहे. मध्य प्रदेशसाठी दिग्विजय सिंह यांनी काहीही केले नाही. या व्यतिरिक्त मनोहर उंटवाल यांनी,” दिल्लीतून ते फक्त आयटम घेऊन आले,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानावरुन टीका होताच उंटवाल यांनी सारवासारव करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नर्मदा यात्रेत सहभागी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेश सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे लवकरच जनतेसमोर आणण्याचे दिग्विजय सिंहानी आश्वासन दिले. ही तीन हजार किलोमीटरची नर्मदा यात्रा नरसिंहपूर जिल्ह्यात नऊ एप्रिल रोजी संपली. ही यात्रा दिग्विजय सिंह ७० वर्षीय आणि त्यांची पत्नी अमृता यांनी केली. मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारकडून पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरही दिग्विजय सिंह यांनी तेव्हा टीका केली.
#DigvijayaSingh did nothing for MP but brought an ‘item’ from #Delhi, says #BJP MP #ManoharUntwal https://t.co/7SDQf1NPLL
— ANI Multimedia (@ANI_multimedia) April 12, 2018