नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन
देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय. पळून जाणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना यामुळे लगाम लागणार आहे.
मंत्रिमंडळानं ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’ला मंजुरी दिलीय. या कायद्यामुळे आर्थिक घोटाळा करून देशाबाहेर पळून गेल्यास गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे. नीरव मोदी प्रकरणानंतर सरकार सावध झालं असून तातडीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.