पोलिसांवर हल्ला,नगरचा उत्तरप्रदेश झालाय : रामदास कदम

नगर : पोलीसनामा ऑनलाईन
”पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांवर हल्ला होतो म्हणजे नगरचा उत्तर प्रदेश झालाय,”अशी टीका रामदास कदम यांनी सताधारी पक्षावर त्यांनी केली.अहमदनगर येथे काल दोन शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर आज रामदास कदम घटनास्थळी आले असताना. त्यावेळी
त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रामदास कदम म्हणाले की,”भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन ही खेळी केली असून या पक्षांकडून अहमदनगरमध्ये दहशत पसरवणे हे यातून दिसते. तसेच पोलिसांच्या संगमतामुळे गुंडाना मिळाल्याने हा प्रकार घडला आहे. पोलीस अधिकारी शिंदे आणि परमार यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शिवसेना दोन्ही शिवसैनिकांच्या कुटुंबियाची जबाबदारी घेणार,” असल्याचे सांगितले.

संबंधित घडामोडी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापांसह चौघांना अटक

शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या