भाजीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीचे केसच कापले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

भाजीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीचे केस कात्रीने कापल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यात घडली. सोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला असून पती कामधंदा करित नाही.पत्नीला सतत मारहाण करतो.असे पिडीत महिलेने तक्रारीमध्ये सांगितले असून आज बनवलेल्या भाजीत मीठ जास्त असल्याचे पतीस वाटले. म्हणून पतीने मारहाण करण्यास सुरुवात केली. माराहाण केल्यानंतर पतीने कात्रीने पत्नीचे केस कापून टाकले. या विरोधात पत्नीने तक्रार दिली असून तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.