श्रीलंकेचे भारताला १५३ धावांचे आव्हान

कोलंबोः पोलिसनामा आॅनलाईन

पाऊस आणि खराब हवामानामुळे उशीरा सुरू झालेला टी २० सामना १ षटक कमी करून १९ षटकांचा करण्यात आला. भारताने टॉस जिंकुन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या १० षटकांत २ गडी बाद ९० धावांच्या दमदार सुरुवाती नंतर भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित माऱ्यामुळे श्रीलंकेच्या १९ षटकांत ९ बाद १५२ धावा. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. निकाला वरून गुणतालिकेत प्रथम कोण असणार हे ठरणार आहे.