मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
”राज्यातील अल्पसंख्याकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याकडे आताचे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना आश्वासन देऊन झुलवत आहे,”असा घणाघणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
”अल्पसंख्याकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार केलाच जात नाही. हे सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. यांच्या मनात अल्पसंख्याकांसाठी काय भावना आहेत हे ओळखू येत आहे. उगाच त्यांना आशेवर ठेवणे बंद करा, असा इशाराही खडसे यांनी भाजप-शिवसेना युती सरकारला दिला आहे. अल्पसंख्याकांचे काम होणार आहे की नाही ते सभागृहात सांगा. उगाच त्यांना आशेवर का ठेवायचे ? स्पष्ट सांगितले तर ते आशेने पाहणार तरी नाहीत. या विभागाच्या निधीसाठी सर्वत्र फिरलो. मात्र त्यांना निधी मिळालेला नाही,” अशी खंत खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.