विषारी दारू पिल्याने १२ जणांचा मृत्यू

हरिद्वार : वृत्तसंस्था – विषारी दारू पिल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला, उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामधील भगवानपूर येथील एका गावात ही घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथेही विषारी दारू पिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

विषारी दारूमुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामधील भगवानपूर येथील एका गावात विषारी दारू पिल्यामुळे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रशासनाने दोन लाखांची तर उपचारासाठी रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे. अशी माहिती हरिद्वारचे जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, याआधी कुशीनगरमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे १० लोकांचा मृत्यू झाला होता.