Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12608 नवे पॉझिटिव्ह तर 364 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. ती एक समाधानाची बाब आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12608 नवे पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात 364 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 10484 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 72 हजार 734 वर जावुन पोहचला आहे. त्यामध्ये तब्बल 4 लाख 1 हजार 442 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 1 लाख 51 हजार 555 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोनामुळं राज्यात तब्बल 19 हजार 427 रूग्णांचे प्राण गेले आहेत. सध्या 1032105 रूग्ण हे होम क्वारंटाईन आहेत तर 37386 रूग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 70.09 टक्के एवढा आहे.