Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12614 नवे पॉझिटिव्ह तर 322 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची वेगाने वाढ होत असताना मृतांची संख्या देखील वाढू लागली आहे. आज पुन्हा सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 3.38 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आतापर्यंत 19 हजार 749 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
12,614 new #COVID19 cases, 6,844 recoveries & 322 deaths reported in Maharashtra today, taking the total number of cases in the state to 5,84,754 including 1,56,409 active cases, 4,08,286 cured cases and 19,749 deaths till date: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/BCb5uEd8Lp
— ANI (@ANI) August 15, 2020
राज्यात गेल्या 24 तासात 12 हजार 614 नवी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 84 हजार 754 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.79 टक्के इतके आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 844 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 4 लाख 8 हजार 286 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.82 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 10 लाख 44 हजार 974 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 37 हजार 524 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1 लाख 56 हजार 409 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 31 लाख 11 हजार 514 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 84 हजार 754 चाचण्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.