Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 16867 नवे पॉझिटिव्ह तर 328 जणांचा मृत्यू
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून योग्यत्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे नवीन रुग्ण 14 हजारांच्या पुढे आढळून येत होते. मात्र, गेल्या 24 तासात राज्यात उच्चांकी 16 हजार 867 एवढे रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान 328 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 281 इतकी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.05 टक्के इतके आहे.
16,867 new #COVID19 cases, 11,541 discharges and 328 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,64,281 including 1,85,131 active cases, 5,54,711 recoveries and 24,103 deaths: State Health department pic.twitter.com/M3rF0IULAI
— ANI (@ANI) August 29, 2020
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना साथीच्या रोगातून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात 11 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात 5 लाख 54 हजार 711 रुग्ण बरे झाले असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.5 टक्के इतके झाले आहे. याच कालावधीत राज्यात 328 रुग्ण दगावले असून राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 24 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 3.15 टक्के इतके आहे.
सध्या राज्यामध्ये 1 लाख 85 हजार 131 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सध्या 13 लाख 12 हजार 059 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 35 हजार 524 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 40 लाख 10 हजार 200 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 7 लाख 64 हजार 281 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.