लासलगाव मधून 1750 मेट्रिक टन कांदा बांगलादेशसाठी रवाना

लासलगाव वृत्तसेवा :- कोसळते कांद्याचे बाजार भाव त्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने केलेले लॉक डाऊनच्या काळात 42 बोगीतून 1750 मेट्रिक टन कांदा बांगलादेशात जाण्यासाठी मध्यरेल्वेच्या लासलगावसह चार रेल्वे स्थानकात मालगाडीत जाण्यासाठी लोड केला जात असल्याने येणाऱ्या दिवसात अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळते कांद्याचे बाजार भाव स्थिर राहण्यासाठी मदत मिळणार आहे.कांद्याला ५०० पासून ९०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून शेतकरी वर्गाला झालेला खर्च निघत नसल्याने कांद्याची अशीच निर्यात जोमाने झाल्यास कांद्याला समाधान कारक भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.

भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशासह जागतिक बाजार पेठेत कांद्याची मागणी घटल्याने कांद्याचे बाजार भाव एक हजार रुपयांच्या आता आल्याने कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे त्यात नाफेड मार्फत केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांच्या हितासाठी 50 हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी सुरू केली आहे मात्र कांद्याचे बाजार भावात कुठलंही मोठी वाढ झाली नाही त्यात बांग्लादेशातून अचानक कांद्याची मागणी वाढल्याने कोलकाता येथील व्यापाऱ्यांनी 1750 मेट्रिक टन कांदा विकत घेतला मात्र हमाल आणि ट्रक न मिळाल्याने व्यापाऱ्यांच्या गोडाऊन वर पडून होता आता ट्रक आणि हमाल उपलब्ध झाल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून विकत घेतला असून तो कांदा मध्यरेल्वेच्या लासलगाव, निफाड, खरेवाडी, मनमाड आणि नांदगाव या पाच स्थानकातून मालगाडीत लोड केला जात आहे अशीच मागणी राहिल्यास कांद्याचे कोसळते बाजार भाव स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे.

– बांगलादेशात कांद्याची मागणी वाढल्याने थेट नाशिक मधून कांद्याची निर्यात
– बांगलादेशात मध्यरेल्वेने रवाना 1750 मेट्रिक टन कांदा
– लासलगाव ,निफाड ,खरेवाडी ,मनमाड आणि नांदगाव या मध्य रेल्वेच्या स्थानकावर 42 बोगीतून कांदा निर्यातीसाठी लोड
– कोसळत्या कांद्याचे बाजार स्थिर राहण्यास मिळणार मदत