8 वी पर्यंतच्या परिक्षा रद्द, 9 वी ,11 वी ची परिक्षा 15 एप्रिल नंतर, शिक्षणोत्तर कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ : सरकारचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये मुंबई,पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर हे 31 मार्चपर्यंत बंद असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 1 ली ते 8 वी ची परिक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे तर इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी ची परीक्षा दि. 15 एप्रिल नंतर घेण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षणोत्तर कर्मचारी आणि शिक्षकांना वर्क फ्रॉर्म होम करण्याची मुभा देण्यात आली आहे. इयत्ता 10 वी चे पेपर वेळापत्रकानुसारच होतील असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.