Mumbai : वीजेच्या धक्क्यानं 2 पालिका कर्मचार्‍यांचा मृत्यू तर 5 जण जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जलवाहीनीच काम सुरु असताना वीजेचा धक्का लागून महापालिकेच्या 2 कर्मचा-यांचा मृत्यू झाला. तर 5 कर्मचारी जखमी झाले. मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगर परिसरात सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.

अमोल काळे (वय 40) आणि गणेश दत्तू असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर महेश जाधव (40) राकेश जाधव (39) नरेश अंधागळे (40) नाना पुकळे (41) अनिल चव्हाण (43) अशी जखमीं कर्मचा-यांची नावे असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहेत.
मुंबईतील कुर्ला परिसरात सुमननगर जवळ मेट्रोचे काम सुरु आहे.

या दरम्यान जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी अचानक 7 कर्मचा-यांना विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला. तर पाच जण थोडक्यात बचावल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.