पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना मध्यान्ह पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी घडली. विषबाधा झालेल्या मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ भारती हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मध्यान्ह पोषण आहारातून २० ते २५ मुलांना विषबाधा झाली.
मध्यान्ह पोषण आहारतून विषबाधा झालेल्या मुलांना अचानक उलट्या आणि इतर त्रास होऊ लागला. अचानक मुलांना त्रास होऊ लागल्याने शिक्षकांनी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शाळेमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विषबाधा झालेल्या मुलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. तसेच ते कोणत्या इयत्तेत शिकत होती हे देखील समजू शकले नाही. विषबाधा झालेल्या मुलांवर डॉक्टरांकडून उपचार सुरु करण्यात आले आहेत. या घटनेची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकांकडून होत आहे.
- गरोदर महिलांच्या ‘या’ सवयीमुळे मुलं बनतील स्मार्ट आणि इंटेलीजेंट
- रक्तस्त्रावाची समस्या, मुत्रदोष, डायबिटीजमध्ये उपयोगी ठरते ‘या’ पानांचे चूर्ण
- झोपण्याअगोदर नियमित घ्या ‘ही’ खास ९ पेय, झटपट कमी करू शकता वजन
- हाय ब्लडप्रेशरला करा बायबाय, नाष्ट्यापूर्वी खावेत ३ खजूर, होतील ‘हे’ फायदे
- सिगारेटचा शरीरावर असा होतो गंभीर परिणाम, शरीराच्या ७ भागांना असतो धोका!
- चहा पिण्याच्या ‘या’ पध्दतीमुळे होऊ शकतो जीवघेणा आजार, रिसर्चमध्ये खुलासा ; जाणून घ्या
- मूळव्याधीची ‘ही’आहेत ६ कारणे, हे सोपे ११ उपाय केल्यास मिळेल आराम
- अंगावर शहारे का येतात ? शरीरातील ‘या’ बदलांची ‘ही’ आहेत कारणे
- गरोदरपणात नियमित करा ‘या’ ५ गोष्टी, होईल नॉर्मल डिलेव्हरी
- गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या