राज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती ! लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे नियोजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण, मीरा-भाईंदर, उदगीर, भुसावळ, महाड आणि किनवटसह 22 नव्या जिल्ह्याची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृवाखालील एका समितीने ठेवला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात नवे जिल्हे आणि तालुक्यांची भर पडणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात करून नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. महसूल, नियोजन विभागाचे सचिव, वित्त, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने नवे जिल्हे आणि तालुके यांचा प्रस्ताव समितीसमोर होते.

राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून तीन नवे जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्ह्याची निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. यासाठी आंदोलन आणि निवेदनं देण्यात आली होती. सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना दिल्याने उदगीर जिल्हा होण्याचे चिन्ह आहेत.

उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट हे दोन तालुके उदगीरमध्ये समाविष्ट होतील. तर नळेगाव हा तालुका नव्याने अस्तित्वात येईल. तसेच नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा तालुका करून हा तालुका उदगीर जिल्ह्यात समाविष्ट केला जाऊ शकतो. तसेच देगलूनर आणि मुखेड हे नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके उदगीर जिल्ह्याला जोडले जाऊ शकतात.

कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ?
ठाणे – मीरा-भाईंदर, कळवण
बुलढाणा- खामगाव
नाशिक – मालेगाव आणि कळवण
भंडारा – साकोली
यवतमाळ – पुसद
अमरावती – अचलपूर
चंद्रपूर – चिमूर
गडचिरोली – अहेरी
जळगाव – भुसावळ
लातूर – उदगीर
बीड – अंबेजोगाई
नांदेड – किनवट
सातारा- माणदेश
पुणे- शिवनेरी
पालघर – जव्हार
रत्नागिरी – मानगड
रायगड – महाड
अहमदनगर – शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर

फेसबुक पेज लाईक करा