पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सुमारे ६० भाविकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर पंढरपूर येथील संसर्गजन्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
संगमेश्वर येथील भाविक एकादशी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला आले. ते धुंडा महाराज मठाशेजारील इनामदार वाडा येथे उतरले आहेत. एकादशी असल्याने त्यांनी शुक्रवारी उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यातील ५० ते ६० भाविकांना उलट्या जुलाब सुरु झाले. त्या सर्व भाविकांना नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या