मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला रिक्षाची धडक बसली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ही घटना मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यामध्ये घडली.
राजकुमार, कैलाशपती, बतिबाई, शीलाबाई, बारेबाला आणि ऑटोरिक्षा चालक बंटी अशी मृतांची नावे आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी रोहित दुबे यांनी सांगितले की, रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. विवाहसोहळा आटोपून ही सर्व मंडळी घराकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा शोध घेतला आहे.