इम्रान तेली, इरफान नुरसुमार, मोहनदास कटारिया व सेवक मखिजा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणी आंतरराष्ट्रीय माफिया गुंतलेले आहेत का याची चौकशी केली जात आहे. पुलवामा हल्ल्यानंर भारत पाकिस्तान व्यापारी संबंधावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पाकिस्तानमधून भारतात आयात करण्यात येणाऱ्या वस्तुंवर 200 टक्के कर आकरण्यात येत आहे. कर चुकवण्यासाठी पाकिस्तानी सुके खजूर ओमान येथे पाठवून ते ओमानचे खजूर असल्याचे भासवून त्याची भारतात निर्यात करण्यात आली. परंतु डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गुप्त चौकशी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
डीआरआयने न्हावाशेवा येथे आणण्यात आलेले 40 टन वजनाच्या 16 कंटनेरमधील 640 टन खजूर जप्त केले आहेत. या खजूरावरील 200 टक्के प्रमाणे 8 कोटी 50 लाख रुपयांचा कर भारत सरकारला देणे गरजे होते. मात्र, हा कर चुकवण्यासाठी हे खजूर ओमान मार्गे भारतात आणण्यात आले होते. मात्र, डीआरआयच्या नेटवर्क मुळे ते जप्त करण्यात आले. याचप्रकारे चैन्नई, गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या खजुराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील व्यापार मर्यादित झाल्यानंतर ही पहीलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी