भुवनेश्वर: वृत्तसंस्था
तीतली वादळाने ओडिशा आणि आंध्रप्रदेशात धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेशात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ओडिशामध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या वादळामुळे दोन्हीही राज्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d462eeb0-cd6e-11e8-887c-3df0eccd60a1′]
या वादळामुळे आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर ओडिशाच्या गोपालपूरमध्ये वादळामुळे मच्छिमारांची नाव बुडाली होती. त्या नावेत ५ मच्छिमार होते. मात्र, सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले असून ते सुरक्षित आहेत. सध्या हे वादळ आंध्रप्रदेशातून व दक्षिण ओडिशातून पुढे सरकले असून पश्चिम बंगालच्या दिशेने गेले आहे. येत्या १२ तासांत ओडिशामध्ये जोरदार वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून तब्बल तीन लाख लोकांना तटवर्ती भागातून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B00D75AB6I,B01M9C51T9,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3357c7d-cd6e-11e8-b14c-cf04a24711df’]
दरम्यान, या वादळामुळे ओडिशा आणि मध्यप्रदेशात नागरिकांची मोठी दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि वृक्ष उन्मळून पडली आहेत. त्यामुळे दूरसंचार यंत्रणाही ठप्प झाली आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या जवानांनी मदत कार्यास सुरुवात केली आहे.