नाशिक : अपहरण करून 9 वर्षाच्या मुलाची हत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नाशिक जिल्ह्यातील सामनगाव रोडवर गाडेकर मळ्यात एका नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आपण केलेल्या चोरीची कुठे वाच्यता होऊ नये या भीतीने शेजारीच राहणाऱ्या तरुणांचे हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी लालबाबू यादव (वय ९) असं मृत मुलाचं नाव आहे. मंगळवारपासून रामजी लालबाबू यादव बेपत्ता होता. यादव कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही. शाळेत नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली पण त्याचा शोध लागला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी लालबाबू यादव (वय ९) असं मृत मुलाचं नाव आहे. मंगळवारपासून रामजी लालबाबू यादव बेपत्ता होता यादव कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेही आढळून आला नाही शाळेत नातेवाइकांकडे चौकशी करण्यात आली पण त्याचा कुठेच लागला नाही.

मंगळवारी दुपारी शेजारी राहणाऱ्या तरुणाने आपल्या मुलगा रामजीला बरोबर नेल्याचे पालकांनी पाहिले होते. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी रामजीबद्दल चौकशी केली त्या वेळी या तरुणाने रामजीच्या आई-वडिलांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

आपण केलेल्या चोरीची कुठे वाच्यता होऊ नये, या भीतीने शेजारीच राहणाऱ्या तरुणांचे हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आलं. त्यातून संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त समीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतला पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली. रोपी तरुणाने घटनास्थळाची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोचून पोलिसांनी पंचनामा केला आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितलं.

दरम्यान, या तरुणाने काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाला सिन्नर येथे सोडतो म्हणून गाडीत बसवलं होतं. त्यानंतर काही अंतर दुर गेल्यावर त्याने प्रवाशांकडून मोबाईल फोन आणि चार हजार लुटले होते. हा सर्व प्रकार मृत रामजी यादव यांनी पाहिला होता . “आपण केलेली लूट कुणाला सांगू नको” अशी धमकी या तरुणाने वृत्त चिमुरड्याला दिली होती. याची वाच्यता कुठेतरी करेल या भीतीने रामजी यादव याला बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून डुबेरे गावातील बंधाऱ्यात गळा दाबून खून केला.