‘पाया म्हणून मुलांनी मातृभाषेत शिकणे आवश्यक’, इंग्रजी शिक्षणाच्या अनिवार्यतेवर सुप्रीम कोर्टानं सांगितलं
नवी दिल्ली : इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सर्व सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम अनिवार्य करण्याचा आंध्र प्रदेश सरकारचा आदेश रद्द करण्यासंबंधीच्या हाय कोर्टच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले, पाया मजबूत होण्यासाठी मुलांनी मातृभाषेत शिकणे जरूरी आहे.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस व्ही. रामासुब्रमणियन यांच्या पीठासमोर आंध्र प्रदेशकडून सादर वरिष्ठ अधिवक्ता के. व्ही. विश्वनाथन यांनी म्हटले की, हायकोर्टचा आदेश गरीब आणि वंचित वर्गाला प्रभावित करत आहे. त्यांनी एका सर्वेच्या संदर्भाने म्हटले की, 96 टक्के आई-वडील आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्यास इच्छूक असतात.
या पीठाने म्हटले की, भारतच एकमेव असा देश आहे, जेथे मुलांना परदेशी भाषेत शिकवले जाते आणि निर्देशांच्या माध्यमातबाबत तज्ज्ञांमध्ये सुद्धा मतभेद आहेत. विश्वनाथन यांनी जोर देत म्हटले की, जीवनात पुढे जाणे आणि संधीसाठी इंग्रजी भाषा जरूरी आहे. जर इंग्रजी भाषेत चांगली असेल तर संधी अमर्यादित आहेत. ते म्हणाले, ते तामिळनाडुतील अशा वकिल मित्रांना ओळखतात, ज्यांनी मातृभाषेत अभ्यास केला आणि आता त्यांना प्रमुख न्यायालयांमध्ये काम करताना अडचणी येतात, कारण ते मातृभाषेतच विचार करतात.
या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी म्हटले, या प्रकरणात हे उदाहरण योग्य नाही आणि मुलांच्या पायासाठी त्यांनी मातृभाषेत शिकणे आवश्यक आहे. विश्वनाथन यांनी म्हटले, त्यांचा हेतू होता की, इंग्रजी चांगले असण्याचा अभाव तेव्हा एक मुद्दा होऊ शकतो, जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिकणार्यांशी तुलना केली जाते. त्यांनी न्यायालयास विनंती केली की, तेलगु माध्यमातून शिकण्याचा पर्याय हिसकावण्यात आलेला नाही. पीठाने म्हटले की, ते राज्य सरकारच्या अपीलावर पुढील आठवड्यात सुनावणी करतील.