नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींना आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.
सत्र न्यायालयाने दोषींविरोधात आज हे डेथ वारंट जारी केले आहे. त्यानुसार 22 जानेवारीला होणारी फाशीची शिक्षा आता 1 फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi court issues fresh death warrant for convicts for 1st February, 6 am pic.twitter.com/hHvXo6Av1d
— ANI (@ANI) January 17, 2020
दिल्ली निर्भया प्रकरणावर पटियाला हाऊस न्यायालयाने 7 जानेवारीला फैसला सुनावला होता. त्यानुसार 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता निर्भयाच्या 4 दोषींना फाशी देण्यात येणार होती. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या विरोधात न्यायालयाकडून डेथ वारंट जारी करण्यात आले होते. याप्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षेच्या याचिकेवर सुनावणी झाली होती यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु आज निर्णय बदलण्यात आला असून दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया –
या निर्णयानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की तारीख पे तारीख येत आहेत, मी या निर्णायाने दु:खी आहे, त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Jo mujrim chahte the vahi ho raha hai…tareek pe tareek, tareek pe tareek. Humara system aisa hai ki jahan convict ki suni jaati hai. pic.twitter.com/y3ZdvN52mV
— ANI (@ANI) January 17, 2020
दोषींना जे हवे आहे तेच न्यायालय करत आहे, दोषींना त्यांचा हक्क आहे, आम्हाला कोणताही हक्क नाही. 7 वर्षांपूर्वी माझी मुलगी गेली. दोषींचा अधिकार पाहिला जात आहे, तो अधिकार आम्हाला नाही. मी 7 वर्षांपासून लढत आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –