सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यातून उदयनराजे लोकसभेची पोटनिवडणूक लढवत असून आज विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सातार्यात प्रचारसभा होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या काळात मूठभर लोकांच्या हातात सत्ता होती. काँग्रेसने राजकारण करताना फक्त राजकारण केले, समाजकारण नाही.
Maharashtra: Prime Minister Narendra Modi being felicitated at a public rally in Satara. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/cGQRlzISOV
— ANI (@ANI) October 17, 2019
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की सातारा ही चळवळीची भूमी आहे आणि पंतप्रधान मोदी ‘आयर्नमॅन’ आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे. मोंदीच्या दूरदृष्टीमुळे सर्वत्र विकास झाला.
काँग्रेसवर उदयनराजे भोसले यांनी भरसभेत निशाणा साधला. ते म्हणाले की काँग्रेसने फक्त राजकारण केले, समाजकारण मात्र केले नाही. सत्येमुळे काँग्रेस पक्षात अहंकार आला. काँग्रेस सत्तेत असताना फक्त काही मूठभर लोकांच्या हातात देशाची सत्ता होती.
यावेळी पंतप्रधान मोदींना जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द करण्यात आल्याने 370 कमळांचा हार घालण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपचे इतर मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते
Visit : Policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी