खळबळजनक ! मुख्यमंत्री ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार, अबू आझमींच्या मुलाची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादग्रस्त विधान केले आहे. ‘ जर उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्येला जाणार, पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुख्यमंत्री 100 दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री मुस्लिमांना घाबरत असल्याचं फरहान याने म्हंटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात 27 जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या मोर्चाला संबोधित करताना फरहान यांनी हे विधान केले.

‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निराश’ :

फरहान म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील जात असतील तर मीसुद्धा जाईल. आम्ही सर्व जाऊ. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आमंत्रित करेन. माझे वडीलही जातील. उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्यासाठी जातील, पण आम्ही बाबरी मशीद बांधायला जाऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत.’ फरहान आझमी पुढे म्हणाले की, ‘तुम्हला सांगू इच्छितो कि, जगभरात 2.5 अरब लोकसंख्या आहे. यातील 50 पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशाला आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही’

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत फरहान म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नरेंद्र मोदींच्या नावावर मते मिळत होती. मात्र त्यांनी आता भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मी सांगतो की, त्यांचे हे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. त्यांनी आतापासूनच नोटाला मत देण्यास सांगितले.

दरम्यान, त्यांनी दिलेलं विधान म्हणजे त्यांची मते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच ते अयोध्येत जात आहेत, असे प्रतिउत्तर शिवसेना नेते उदय सामंत यांनी फरहानच्या या वक्तव्यावर दिले.