मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ भीषण अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याहून मुंबईला निघालेल्या महिन्द्राची कंटेनरला मागून जोरदार धडक बसल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ हा अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

जाहिरात

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मावळ तालुक्यातील पाच जण पुण्याहून मुंबईला निघाले होते. तेव्हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील किलोमीटर क्रमांक 36/500 जवळ हा अपघात झाला. या अपघातात रवी बबन ठोंबरे (वय 24) व अक्षय शांताराम दाभाडे (वय 22 दोघेही रा. बऊर कामशेत, ता. मावळ) येथील रहिवासी आहेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर चरण ठाकर (वय 26), कनैय्या सोरटे (वय 26, दोघेही रा. तळेगाव) व सचिन वाळूंज (वय 31, रा. बऊर कामशेत) हे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघातानंतर काही काळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान या अपघाताचा तपास खोपोली पोलीस करीत आहेत.

जाहिरात