भारतीय सैन्याने हे वर्ष विकलांग सैनिकांना समर्पित केले आहे. यानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे देशभरातील अशा सैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन पुण्यातील बाँम्बे इंजिनिअर ग्रुपच्या शहीद भगतसिंग सभागृहात आयोजन गुरूवारी केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शत्रुशी दोन हात करताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचा रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के.सैनी उपस्थित होते. तसेच लष्करातील अधिकारी आणि माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. मधुमेह, उच्च रक्तदाब अशी खोटी वैद्यकीय कारणे देऊन सीमेवर, कठीण, अडचणीच्या ठिकाणी जबाबदारी टाळणा-या अधिका-यांवर येत्या काळात लष्कराच्या मुख्यालयातून थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा ही लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला.
रावत म्हणाले, लष्करात येणा-या जवानांना आणि अधिका-यांना कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यामुळे दबाव आणि तणाव सहन करण्याची क्षमता मिळत असते. मात्र, काही अधिकारी तसेच जवान स्वत: ला हा दबाव सहन करू शकत नाही. उच्च रक्तदान, या मधुमेह सारख्या आजारांची कारणे देत आघाडीवर जाण्यासाठी नकार दिला जातो. असे सैनिक हे मानसिक दृष्ट्या विकलांग असतात. अशा ढोंगी सैनिकांना चेतावणी देण्यात आहे की जर वेळेत सुधारला नाही तर लकवरच त्यांना लष्कराच्या मुख्यालयातून कारवाई करण्यात येईल.