CAA वर बोलला गोविंदा, म्हणाला- ‘तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार गोविंदा आपल्या अभिनयासोबतच बिंधास्त वक्तव्यासाठी ओळखला जातो. मंगळवारी गोविंदा उत्तर प्रदेशातील खरगोनमध्ये आयोजित मेळाव्यात आला होता. यावेळी त्यानं डान्सही केला. यानंतर गोविंदानं आयफा अवॉर्ड आणि CAA च्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

CAA वर काय म्हणाला गोविंदा ?
CAA च्या समर्थनार्थ जे कलाकार पुढे येत आहेत त्यावर बोलण्यासाठी आधी तर गोविंदानं नकार दिला. त्यानं म्हटलं की, “मी काही नाही बोलणार. मी राजकारण सोडलं आहे. मी काही बोललं तर तसंच होईल, ‘तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं ?’ असं तो म्हणाला.

आयफा अवॉर्डबद्दल गोविंदा म्हणाला…
इंदोरमध्ये होणाऱ्या आयफा अवॉर्डबद्दल गोविंदा म्हणाला, “मध्य प्रदेश हिंदुस्तानाचं हृदय आहे आणि फिल्म लाईज हृदयातून निघालेला आवाज आहे जो पूर्ण जगापर्यंत पोहोचतो. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यात यश यावं. नर्मदा आईचा नेहमीच आशीर्वाद रहावा.”

गोविंदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रंगीला राजा हा त्याचा लास्ट रिलीज झालेला सिनेमा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. सध्या गोविंदाकडे चांगल्या बॅनरचे आणि मोठे सिनेमे नाहीत असं दिसत आहे. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये गोविंदा गेस्ट म्हणून दिसला आहे.