विनोद खन्ना यांच्याशी गीतांजली यांनी १९७१ मध्ये लग्न केले होते. पण अचानक विनोद खन्ना यांनी आपले फिल्मी करिअर, कुटुंब सगळे काही मागे सोडले आणि ओशो आश्रमात गेले यानंतर गीतांजली त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या. १९८५ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
या घटस्फोटानंतर पाच वर्षांनी म्हणजे १९९० मध्ये विनोद खन्ना यांनी दुसरे लग्न कविता यांच्याशी केले कवितापासून विनोद खन्ना यांना साक्षी हा मुलगा व श्रद्धा ही मुलगी अशी दोन मुले झाली. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होऊनही विनोद यांनी आपले पित्याचे कर्तव्य निभावले. बॉलिवूड मध्ये अक्षय खन्नाला लॉन्च करण्यासाठी ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट बनवला. २७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्ना यांचे निधन झाल्यानंतर. आता पाठोपाठ त्यांच्या पहिल्या पत्नी गीतांजली यांनीही या जगाचा निरोप घेतला.