6 वर्षांचं नातं तुटल्यानंतर अभिनेत्री आशा नेगीनं सोडलं ‘मौन’ ! म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाइन –जवळपास 6 वर्षे एकमेाकांना डेट केल्यानंतर अभिनेता रित्विक धनजानी आणि अभिनेत्री आशा नेगी वेगळे जाले आहेत. दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. अशात आता अभिनेत्री आशा नेगी हिनं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिचं दु:ख स्पष्ट दिसत आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आशा नेगीनं ब्रेकअपच्या बातम्यांवरील मौन सोडलं आहे. आशा नेगी म्हणाली, “लोकं वेगळे होतात, नातं तुटतं. आयुष्यात सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, आपण त्या व्यक्तीच्या आठवणी सोबत ठेवत असतो.”

आशा म्हणाली, “मला माझ्या पर्सनल लाईफबद्दल जास्त काही बोलायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे की, सन्मान कायमच राहणार आहे.” आशाच्या बोलण्यातून तिचं दु:ख स्पष्ट दिसत होतं.

आशा आणि रित्विकबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता मालिकेत काम करताना दोघं क्लोज आले होते. 2013 मध्ये दोघांनी नातं ऑफिशियल केलं होतं. नंतर लग्नाच्याही अफवा समोर आल्या होत्या ज्याचं दोघांनी खंडन केलं होतं.

https://www.instagram.com/p/B4IXdHZA1NZ/

https://www.instagram.com/p/BzKp939glD_/

https://www.instagram.com/p/ByukW9GgRlG/