गेल्या 8 वर्षांपासून शेती करतेय बॉलिवूडमधील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री ! सांगितलं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस जुही चावला (Juhi Chawla) ही तिच्या अभिनया सोबतच अनोख्या कामासाठीही ओळखली जाते. जुही टॉवर्समधून निघणाऱ्या धोकादायक लहरींविरोधात जगजागृतीही करते. इतर अनेक सामाजिक कामात तिचं योगदान आहे. जुही गेल्या काही वर्षांपासून सेंद्रीय शेती करत आहे. सेंद्रीय उत्पादन वापरला तिचं प्रोत्साहन आहे.

पालघरमधील वाडा येथील फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते. आमिर खानच्या सत्यमेव जयतेमधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली.

जुहीच्या वडिलांनीच त्या भागात 20 एकर जमीन खरेदी केली. तिचे वडिल शेतकरी होते. जुही ॲक्टींगमध्ये बिजी असल्यानं तिला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. वडिल गेल्यानंतर मात्र तिनं सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. यातून तिनं अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही.

जुहीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर जुही चावला आणि जय मेहता 1995 मध्ये विवाहबद्ध झाले होते. जय मेहता एक बिजनेसमन आहे. त्यांच्या नात्याबद्दल जवळच्या काही मित्रांना आणि नातेवाईकांनाच माहिती होतं. मीडियापासून तिनं ही गोष्ट लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच तिनं याचं कराणही सांगितलं होतं. या कपलनं आता सहजीवनाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. जुहीला 2 मुलं आहेत. तिच्या मुलीचं नाव जान्हवी आणि मुलाचं नाव अर्जुन आहे.