मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री परिणीती चोपडा लवकरच जबरिया जोडी या सिनेमात दिसणार आहे. परंतु परिणीती चोपडा आपल्या सिनेमामुळे नाही तर ब्रेकअपच्या बातमीमुळे चर्चेत आली आहे. तसं पाहिलं परिणीती आपल्या नात्यावर कधीच खुलून बोलली नाही. आता मात्र तिने ब्रॉयफ्रेंडचे नाव न घेताच ब्रेअकपनंतर ती खूप वाईट काळातून गेली असे तिने सांगितले.
काही दिवसांपूर्वी परिणीती आणि डायरेक्टर मनीष शर्मा यांच्या अफेअरच्या खूप चर्चा सुरु होत्या. असे म्हटले जात आहे की, दोघेही पुढे वेगळे झाले. ब्रेकअपनंतर ती किती खचली होती आणि नंतर कसं सगळं ठिकठाक झालं हे परिणीतीने सांगितले आहे.
परिणीती म्हणाली की, “मी ब्रेकअप झाल्यानंतर एका मोठा काळ अनुभवला आहे. मला वाटतं की, हे एकदाच झालं असेल. इमानदारीने सांगते, मी खूप वैतागलेले होते. तो माझ्या आयु्ष्यातील सर्वात वाईट काळ आहे. कारण मी तोपर्यंत अशा प्रकारच्या रिजेक्शनचा सामना नव्हता केला. त्यावेळी मला माझ्या कुटुंबाची सर्वात जास्त गरज होती.
परिणीतीने लेडिज वर्सेस रिकी बहल या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्माने केले होते. यानंतर ती शुद्ध देसी रोमँसमध्येही दिसली होती. या सिनेमाचेही दिग्दर्शन मनीष शर्माने केले होते. त्यानंतरच दोघांच्या अफेरची चर्चा सुरु झाली. नंतर दोघे वेगळे झाले.
- दातांमध्ये वेदना का होतात ? कारणांसह जाणून घ्या ८ ‘खास’ उपाय
- आयुर्वेदात सांगितलेले दुध पिण्याचे नियम माहित आहेत का ? जाणून घ्या
- तुमच्या घरातच आहेत ‘या’ गोष्टी, ज्यामुळे तुम्हाला होऊ शकतो कॅन्सरसारखा आजार
- रक्त शुद्ध करण्याच्या ‘या’ नैसर्गिक १४ उपायांनी शरीर राहील नेहमी निरोगी
- प्राचीन काळापासून आहेत ‘ही’ रामबाण औषधे, जाणून घ्या २९ उपाय
- ताकात मध मिसळून पिल्याने होतात हे फायदे, मधाचे ७ उपाय
- वजन वाढवायचे असेल तर आहारात करा ‘या’ ५ गोष्टींचा समावेश ; जाणून घ्या