अपर पोलीस महासंचालकाच्या साडेचार महिन्यांत तीन ठिकाणी बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अपर पोलीस महासंचालक दर्जाचे पाच अधिकारी तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाला असता एकाच अधिकाऱ्याची साडेचार महिन्यात तिसऱ्यांदा बदली करण्याचा पराक्रम गृह विभागाने केला आहे. अपर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांची गेल्या साडेचार महिन्यांत तीन वेळा बदली केली आहे.

इतक्या कमी कालावधीत एखाद्या अपर पोलीस महासंचालकांची तीनदा बदली करण्याचा कोणत्याही शासनाने केलेला हा विक्रम असावा. बारा दिवसांपूर्वी त्यांची राज्य महामार्ग वाहतूक शाखेतून नियुक्ती केली असताना आता त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदी बदली केली आहे. गृह विभागाकडून मंगळवारी त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले.

विशेष म्हणजे त्यांच्या समकक्ष दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कधीच पूर्ण झाला आहे, मात्र त्यांची बदली होण्याऐवजी बिष्णोई यांना झटपट तीन ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली आहे. एका ठिकाणी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी असताना गृह विभागाकडून त्यांच्यावर दाखविण्यात आलेल्या या विशेष प्रेमाची वरिष्ठ अधिकाऱ्यांतून चर्चा होत आहे. संदीप बिष्णोई हे १९८९ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ३० मे रोजी त्यांची राज्य राखीव दलातून पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर ११ आॅक्टोबरला त्यांची राज्य वाहतूक महामार्ग येथे बदली करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १२ दिवसांत त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदी बदली केली. त्यांच्या जागी सिडकोतील मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगावकर यांची बदली करण्यात आली आहे.

बियर बारमध्ये पट्ट्याने मारहाण करून पोलीस पाटलाचा खून

त्याचवेळी कार्यकाळ पूर्ण झालेले अपर महासंचालक दर्जाचे पाच अधिकारी सध्या बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी ( २६ मे २०१६), प्रशासन विभागाच्या प्रज्ञा सरवदे (१६ मे २०१६), जीएसटी विभागातील मुख्य दक्षता अधिकारी के. के. सारंगल ( १३ मे २०१६), बी. के. सिंग (१४ मे २०१६) आणि संजयकुमार वर्मा (२७ मे २०१६) यांचा समावेश आहे.

जाहिरात