Aditya Thackeray | वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या (Vedanta-Foxconn Semiconductor Project) मुद्यावरुन राजकारण तापले आहे. त्यात आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) नवा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर नवा आरोप केला आहे. रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही (Bulk Drug Park Project Raigad) महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. दावोसमधून तीन दिवसांत 80 हजार कोटी आणल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, बल्क ड्रगमध्ये सरकार पावणेतीन कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार होती. नव्या घटनाबाह्य बेकायदेशीर सरकारने 40 आमदारही तिकडं नेले आणि दोन मोठे प्रकल्पही तिकडे नेले. केंद्राबरोबर नीट सांगड घातल्यास सर्व शक्य आहे. पण यांचे कारभारात लक्ष नाही. बल्क ड्रगमुळे 80 हजार रोजगार निघून गेले. अजून तरुण शांत आहेत पण त्यांचा अंत पाहू नका. बल्क ड्रग पार्कही आपल्याकडून कसा काय गेला? एकही गुंतवणूक केंद्राच्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. मग केंद्राला पाठपुरावा करुन आम्ही आणले मग यांना का जमत नाही? असा सवाल त्यांनी केला.
बल्क ड्रग पार्कसाठी केंद्राला आम्ही पत्र देऊन मागणी केली होती. पण तोही गुजरातमधील भरुचकडे जात आहे. गणेश दर्शन घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का? उद्योगमंत्री म्हणतील की, हे आरोग्य विभागाचा आहे. आरोग्यमंत्री म्हणतील हाफकिनच्या माणसाला विचार, असे देखील आदित्य ठकरे म्हणाले.
After Vedanta- Foxconn loss, the Bulk Drug Park that had been meritoriously pursued by the MVA Government, has been lost to 3 States- Gujarat, Andhra Pradesh & Himachal Pradesh, by the current unconstitutional dispensation in our State, due to its lack of interest in development pic.twitter.com/xJh0NeG08I
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 14, 2022
फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटे मेसेज फिरवण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही.
प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला? याचं उत्तर मिळाल नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच 40 गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते.
त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Web Title :- Aditya Thackeray | aaditya thackeray after vedanta another project has gone aditya thackeray says govts industry
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात