मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना ७ वर्षे तुरुंगवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ताब्यात असलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २५ वर्षांनंतर  नऊ पोलिसांना प्रत्येकी सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जून १९९३ मध्ये ही घटना घडली होती.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e80b1c50-b0c8-11e8-92e1-dbc56a833bf1′]

उच्च न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. ते मान्य करुन सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यातील बहुतेक पोलीस कर्मचारी आता निवृत्त झाले आहेत. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना भा.दं.वि. कलम ३३० (गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी ताब्यात असताना मारहाण) अंतर्गत दोषी मानण्यात आलं आहे.

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण मारहाण न सांगितल्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. मात्र घटनेच्या रात्री पोलिसांची वागणूक आक्षेपार्ह मानत त्यांना कमाल सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायमूर्ती एन. व्ही. रमना यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली.

‘अधिकार आणि जबाबदारी यांना सोबत घेऊन चालावे लागते. जास्त अधिकारांचा अर्थच जास्त जबाबदारी असा आहे. देशात कायद्याचे राज्य असल्याचा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण करुन देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी लोकांसाठी उत्तरदायी बनणं गरजेचे आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण गरजेचे आहे, पण त्यासाठी चुकीच्या मागार्चा अवलंब केला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.

ठाण्यातून सरकारी वाहन चोरुन धूम ठोकणारा चोरटा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

नागपूरातील देवलपार पोलीस ठाण्यात २३ जून १९९३ रोजी रात्री एक काँस्टेबल तिघा जणांना पोलीस निरीक्षकांकडे घेऊन आला. शहरातील एका हॉटेलमध्ये आपल्याला लुटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींनी या घटनेची कोणतीही तक्रार दिली नव्हती.

जॉईनस याच्यावर यापूर्वी अशा काही चोरीचे आरोप होते. मध्यरात्री एक वाजता पोलीस निरीक्षक दहा पोलिसांचे पथक घेऊन जॉईनस याच्या घरी गेले. त्यांनी जॉईनसला त्याच्या घराच्या बाहेर एका खांबाला बांधले आणि बेदम मारहाण केली. पुन्हा एका ठिकाणी त्याला नेऊन मारण्यात आलं. त्याच अवस्थेत त्याला पहाटे पावणेचार  वाजता कोठडीत टाकण्यात आले. सकाळपर्यंत जॉईनसचा मृत्यू झाला होता.

जॉईनसची पत्नी जरीनाची छेडछाड आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला त्रास दिल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला. दरम्यान, उच्च न्यायालयात हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही. उच्च न्यायालयाने दहा पोलीस कर्मचाऱ्यांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाने नऊ जणांना मंगळवारी मारहाणीत दोषी असल्याचा निर्णय दिला.

पुणे : ९६ लाख लुटीच्या प्रकरणात एपीआयसह पोलिसाला ३ वर्षाची शिक्षा