या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्णवच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा विमाननगर येथील व्होडाफोन कंपनीमध्ये काम करत होता. त्याच्या फ्लटच्या खिडकीमध्ये कबुतरांनी घरटे बनलवे असून त्यामध्ये अंडी घातली आहेत. अर्णव हे समजताच त्याने आठ अंडे काढून त्याचे ऑम्लेट बनवून खाल्ले.
तसेच त्यासोबत बिअर देखील पिली. काही वेळानंतर तो वेड्यासारखा वागू लागल्याने त्याच्या पत्नीने त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वर्तवणुकीमुळे त्याची पत्नी खुप घाबरली. अर्णव याने फ्लॅटच्या गॅलरीचा दरवाजा उघडून आठव्या मजल्यावरुन उडी मारली.
तिने तात्काळ या घटनेची माहिती नातेवाईक आणि मित्रांना फोन करुन दिली. अर्णवला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अर्णवच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, कबुतराची अंडी खाण्यास त्याला विरोध केला होता. मात्र अर्णवने तिचे काहीही ऐकले नाही. त्याने ऑम्लेट आणि बिअर पिल्यानंतर वेड्यासारखा वागू लागला. अर्णव याचे नातेवाईक कोलकत्ता येथून पुण्यात आले आहेत. पोलिसांनी अर्णवचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. पुढील तपास विमाननगर पोलीस करीत आहेत.