धक्कादायक ! गेवराईमध्ये पतीचा अंत्यविधी होताच पत्नीनं घेतला गळफास, बीड जिल्हयात खळबळ

बीड :पोलीसनामा ऑनलाइन –पतीने आत्महत्या केल्यानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही गळफास घेउन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे घडली आहे. एक वर्षापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. जोडप्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. रणजित जाधव ( 22 वर्षे) आणि मिनाक्षी जाधव ( 20 वर्षे) अशाी आत्महत्या केलेल्या जोडप्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर रणजीत पत्नी मिनाक्षीसोबत भाड्याच्या खोलीत राहत होते. बुधवारी किरकोळ कारणावरुन रणजितने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्याचे पार्थिव रात्री उशिरा चकलांबा गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

आई-वडिलांसह इतर नातेवाईक दु:खात असतानाच गुरूवारी (12 मार्च) सकाळी आठ वाजत मीनाक्षाीने घरालगत असलेल्या शौचालयात दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधाारणाः दोघांनी एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे पती-पत्नींच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली आहे.