मोदींच्या चुकींच्या धोरणांपासून वाचविण्यासाठी काँग्रेस ‘कटिबद्ध’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड येथून निवडणूक लढवली होती पण यंदा काँग्रेसला पारंपरिक मतदार संघात हार पत्करावी लागली आणि दुसरीकडे वायनाड येथील मतदारांनी राहुल यांना प्रचंड मतांनी निवडून दिले त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी वायनाड मतदार संघातील मतदारांचे आभार मानले.

ते म्हणाले कि, तुम्ही सर्वांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. हा विजय माझ्यासाठी अद्वितीय होता. मोदी सरकार देशात द्वेष पसरवत असून देशातील कमजोर वर्गाला मोदींच्या चुकींच्या धोरणांपासून वाचविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे राहुल यांनी म्हटले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि,सध्याचे विद्यमान सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु, द्वेष संपविण्यासाठी केवळ प्रेमाची गरज आहे. देशातील कमजोर घटकांना वाचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मी तुमचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयार असून वायनाडचा विकास करण्यासाठी सज्ज असल्याचे राहुल यांनी म्हटले. यावेळी राहुल वायनाड येथील जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आले होते.

दरम्यान यंदाच्या लोकसभेत राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड असणाऱ्या अमेठी येथे राहुल गांधी यांचा पराभव झाला होता हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागणारा आहे.

या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी या विजयी झाल्या होत्या. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी प्रथमच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होते. राहुल गांधी वायनाड येथे पोहोचल्यानंतर हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.