ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’मधील वृक्षतोड गाजली असताना व शिवसेनेचा त्याला विरोध होत असताना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना ठाणे मेट्रोसाठी रात्रीत झाडांची कत्तल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही बाब समोर आली आहे.
ठाण्यात पहाटे दोन वाजता झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचे समजल्यावर अविनाश जाधव हे तातडीने तेथे गेले. तोपर्यंत सहा ते सात झाडे मुळासकट तोडण्यात आली होती. पहाटे दोन वाजता अविनाश जाधव हे तेथे पोहचले व त्यांनी ही वृक्षतोड थांबविली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली.
ठाणे महापालिकेने कोणते ही झाड तोडायचे असेल तर त्याठिकाणी वन विभाग किंवा इतर अधिकारी उपस्थित असणे आवश्यक केले आहे. असे असताना यावेळी झाड तोड होत असताना त्या ठिकाणी वन विभाग किंवा इतर कोणी अधिकारी उपस्थित नव्हता, असे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.
Visit : Policenama.com
- नक्की किती तास झोप घ्यावी ? कमी आणि जास्त झोपेचे ‘हे’ आहेत ५ परिणाम
- शरीराच्या सर्व अवयवांचा होतो व्यायाम, द्रोणासनाचे ‘हे’ ३ फायदे
- लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत ७ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- त्वचा सुंदर बनविण्यासाठी ‘या’ ८ टिप्स तुम्हाला पडतील उपयोगी, जाणून घ्या
- कंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे
- मज्जातंतू कार्यक्षम होण्यासाठी करा ‘परिवर्तित चक्रासन’, हे आहेत ५ फायदे