Lockdown 4.0 : 31 मेनंतर पुन्हा ‘लॉकडाऊन’ वाढणार ? सद्यस्थिती काय सांगते अन् कसा असेल सरकारचा नवा ‘प्लॅन’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायसरमुळं फक्त भारताच नाही तर संपूर्ण जगातील 200 हून अधिक देश संकटात सापडले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सध्या देशात 31 मेपर्य़ंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. देशात रोज 7 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार 31 मार्च नंतर काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 1 लाख 51 हजार 767 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासात 6387 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. सगल दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत देशातील लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात अधिकची सूच मिळण्याची शक्यता आहे.
असा असू शकतो प्लॅन

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, दर 14 दिवसांनी लॉकडाऊनचा आढावा घेतला जाईल. यापुढे केंद्राची भूमिका लॉकडाऊनमधील नियम, कर्जमाफी आणि निर्बंधाबाबत कमी असेल, जास्त अधिकार हे राज्यांना देण्यात येतील. जास्त अधिकार हे राज्यांना देण्यात येतील. गृह मंत्रालय पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवरील नियमावली जाहीर करेल. यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्यच राहणार आहे. या शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
अशी होती नियमावली

देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 बाबत 17 मे रोजी नियमावली जाहीर केली होती. यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर सर्व झोनना सूट दिली होती. तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे, शाळा-महाविद्यालये, कोचिंग संस्था, पब-बार, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे, जिम, थिएटर, क्लब, मॉल्स इत्यादी बंद ठेवली आहेत. लॉकडाऊन 4 दरम्यान सरकारने 21 मे पासून गाड्या पुन्हा सुरु केल्या आहेत. तसेच 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणेही सुरु केली आहेत. लवकरच मेट्रो सेवा सुरु करणार असल्याची चर्चा आहे.