प्रेमसंबंधावरुन पत्निच्या आत्महत्येनंतर पतीनेही संपवलं आयुष्य

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून पत्निने आत्महत्या केली, तर पत्निच्या पालकांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याने पतिनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जोडप्याने आंबेगाव येथील राजयोग सोसायटीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर शिळीमकर (वय,32 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे आई-वडील व काका यांच्या विरुद्द गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’780048dd-c6fd-11e8-841c-0b38ea82dc18′]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागरची पत्नी गितांजलीला तिच्या प्रियकरासोबत सागरच्याच फ्लॅटमध्ये रंगोहाथ पकडले होते. त्यानंतर गितांजलीने सागरशी भांडण करुन २४ सप्टेंबरला आत्महत्या केली. गितांजलीच्या आई जयश्री पवार यांनी सागरचा भाऊ सुहास शिळीमकर याला तिच्या मृत्यूस जबाबदार ठरवले. तसेच गितांजलीचे प्रेमसंबंध सर्वांना सांगेल अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. असा आरोप त्यांनी केला.

या प्रकराणातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत जयश्री पवार यांनी शिळीमकर कुटुंबाकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. या सर्व त्रासाला कंटाळून सागर याने जेथे गितांजलीने आत्महत्या केली होती, त्याच ठिकाणी, त्याच घरात २९ सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी लक्ष्मण बर्डे आणि आयर्न राक्षे यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खानविलकर करत आहेत.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d55a410-c6fd-11e8-9f45-6fc7de28903a’]

सागर व गितांजली यांचा डिसेंबर २०१३ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांनी सागरचा भाऊ सुहास याला गितांजलीचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. गितांजली व सागर आंबेगाव खुर्द येथे राहत होते, तर सुहास भोर तालुक्यातील वीरवाडी येथे राहत असे. तो सतत गितांजलीच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना सांगेल अशी धमकी देत होता. ते कोणाला सांगू नये यासाठी तिच्याकडे शरिरसुखाची मागणी करत होता. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी गितांजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात