मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा 

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

राज्यातील विविध भागात मातंग समाजातील व्यक्तीवर होणाऱ्या हल्ल्या विरोधात सारसबागेसमोरील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, हनुमंत साठे, भगवानराव वैराट, सुभाष जगताप, अशोक लोखंडे यांच्यासह अनेक नेते मोर्चात सहभागी झाले होते.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43c6ff9d-8cbe-11e8-a354-6523be0c350b’]

लातूर येथील रुद्रवाडी येथे नवरदेव मारुतीच्या मंदिरात गेला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. तर जळगावमध्ये विहिरीत दोन मुले पोहली त्याकारणावरून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली हाेती. पुण्यातील उमेश इंगळे यांची हत्या होऊन याला जवळपास महिन्याभराचा कालावधी होत आला. यासह अनेक प्रश्नावर आज सारसबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यातील विविध भागातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.