अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. संगमनेरमध्ये रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कृष्णा सुपेकर (वय 6), श्रावणी सुपेकर (वय 9) ही मयत भावंडांची नावे आहेत. या दोघांची मोठी बहीण वैष्णवी (वय 13) हिच्यावर संगमनेरमधील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर यांचे कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहे. शहरातील मालदाड रोडवरील आंबेडकरनगर वसाहतीत ते वास्तव्याला आहेत. मोलमजुरी करून सुपेकर व त्यांची पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
रात्री नऊच्या सुमारास त्यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व इतरांना त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना बहिण-भावाचा मृत्यू झाला.
Visit : Policenama.com
- स्मरणशक्ती कमी झाली आहे का ? वाढवण्यासाठी करा ‘हे’ ४ सोपे उपाय !
- त्वचाविकारांत होतेय वाढ, नियंत्रण मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ८ गोष्टी
- कोथिंबिरीची फुले अनेक आरोग्य समस्यांवर गुणकारी ! ‘हे’ आहेत ५ फायदे
- जीवनात असे घडत असेल तर एक ‘ब्रेक’ जरूर घ्या, जाणून घ्या 7 संकेत
- स्त्रीयांसाठी धुम्रपान अतिशय घातक ! ‘हे’ आहेत 5 धोके
- बुटांच्या दुर्गंधीने त्रस्त आहात का ? जाणून घ्या ४ घरगुती उपाय
- चुकीच्या डाएटचे ‘हे’ आहेत ८ गंभीर परिणाम, वजन कमी करताना घ्या काळजी