5 बायकांचे महागडे ‘शौक’ पूर्ण करण्यासाठी त्यानं केली तब्बल 50 मुलींची ‘शिकार’, असा घालत होता गंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जबलपूरमध्ये राहणाऱ्या दिलशाद याने एक दोन नव्हे तर तब्बल 5 तरूणींशी विवाह केला. सर्व पत्नींना मुले देखील झाली. मात्र त्यानंतर जसेजसे कुटुंब वाढू लागले त्यानंतर त्याला घर चालवणे अवघड होऊन बसले. त्यामुळे त्याने आपला घरखर्च चालवण्यासाठी फसवणुकीचा धंदा सुरु केला. मात्र पोलिसांनी पकडल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तपासात त्याने आतापर्यंत 50 तरुणींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

5 बायकांवर खर्च होत असे लाखो रुपये
तपासात त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या 5 बायकांपैकी 4 थी बायको जबलपूरमध्ये एक खासगी हॉस्पिटल चालवते. बाकीच्या चार या घरीच असून बायका आणि मुलांचे खर्च भागवण्यासाठी त्याने हे प्रकार करणे सुरु केले. त्यानंतर त्याला सुचलेल्या कल्पनेतून त्याने एक गॅंग तयार केली. या गँगच्या माध्यमातून तो तरुणींना नर्सची नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करत असे. भोपाळच्या एम्समध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तो तरुणींची फसवणूक करत असे. गॅंगमधल्या एका सदस्यांची पत्नी हि एम्समध्ये अधीक्षक या पदावर काम करत असल्याने त्याने याचा फायदा उचलला होता.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दिलशाद आणि अलोक कुमार यांना अटक केली असून बाकी आरोपींचा तपास सुरु आहे. या प्रकरणात त्याने या 50 तरुणींना आतापर्यंत लाखो रुपयांना गंडा घातला असून पोलिसांकडे या प्रकरणी अनेक तक्रारी देखील आल्या होत्या.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी