‘हे’ रिअल लाईफ कपल भन्साळींच्या चित्रपटात साकारणार एक अमर प्रेमकहाणी ?

मुंबई : वृत्तसंस्था – बाजीराव -मस्तानी ,पद्मावत सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर संजन्य लीला भन्साळी लवकरच एका प्रेम कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत रिअल लाईफ कपल ऐश्वर्या -अभिषेक दिसणार असल्याची चर्चा होत आहे.

अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या अमर प्रेमकथेवर आधारित चित्रपट घेऊन संजय लिला भन्साळी येत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन साहिर लुधियानवी तर ऐश्वर्या राय बच्चन ही अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होत आहे. अद्याप या वृत्ताची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र ऐश्वर्या आणि अभिषेकच या चित्रपटात दिसतील असं म्हटलं जात आहे.

याचित्रपटात अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी दीपिकाच संजय लीला भन्साळींची पहिली पसंती होती. दीपिकाने भन्साळीं सोबत राम-लीला,‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र आता भन्साळींनी ऐश्वर्याची निवड केली असल्याच्या चर्चा आहे. जर ऐश्वर्या -अभिषेकनं होकार दिला तर बऱ्याच वर्षांनी ही जोडी छोट्या पडद्यावर एकत्र दिसेल.

ऐश्वर्या -अभिषेक या रियल लाईफ जोडीने ‘कुछ ना कहो’, ‘धुम २’, ‘गुरु’, ‘रावण’, ‘सरकार राज’ यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘गुलाबजाम’ सारख्या चित्रपटातअभिषेक -ऐश्वर्या एकत्र दिसणार होते. मात्र काही कारणानं या चित्रपटातून दोघांनी माघार घेतली. आता ही जोडी संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात एकत्र  दिसतील अशी चर्चा होत आहे.