Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी कर्मचारी संपावर (Government Employees Strike) गेल्याने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Shinde Group MLA Sanjay Gaikwad) यांनी 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामीची कमाई आहे, असे वादग्रस्त विधान केलं होत. यावरुन अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत संजय गायकवाड यांना चांगलेच सुनावले. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या (Panchnama) मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले अजित पवार?
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. आता कर्मचाऱ्यांचा संप आणि शेतपिकांचे पंचनामे हे दोन्ही विषय एकमेकांशी निगडीत झाले आहेत. महाराष्ट्र हा दुहेरी कात्रीत सापडला आहे. अशावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड हे 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असे वक्तव्य करत आहेत. हे पटतं का? अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
सत्ताधारी आमदारांकडून वादग्रस्त विधानं सुरु आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी राज्यातल्या ९५ % सरकारी कमचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातला कर्मचारी नाउमेद होऊ शकतो. याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होणार आहे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/g9i8ywbxCd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 20, 2023
तर राज्य चालवणं कठीण होईल
ते पुढे म्हणाले, हाताची पाचही बोटं सारखी नसतात, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, सर्वच कर्मचाऱ्यांना तुम्ही एकसारखं समजणार असाल, आणि तेच जर नाऊमेद झाले तर राज्य चालवणं कठीण होईल. पंचनामे कसे होणार? गरपिटीने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत कशी होणार? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच ज्या भागात नुकसान झाले आहे त्या भागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी माणुसकीच्या भावनेने ताबडतोब कामावर परत यावं, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असं आवाहन देखील त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केलं.
राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं भूईसपाट झाली आहेत. या नैसर्गिक संकटानं राज्यातला शेतकरी आडवा झाला आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात गारपीटीसह अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात, फळबागांमध्ये गारांचा खच पडलेला आहे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/jjvlxHrnP9
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 20, 2023
सरकार गंभीर नाही
वादळी पावसामुळे (Stormy Rain) मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
100 च्या आसपास पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कर्मचारीही संपावर आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. परंतु सरकार या मुद्यांवर गंभीर दिसत नाही.
अशावेळी किमान विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) तरी सरकारला आदेश काढावेत,
त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सरकारला सुनावलं.
Web Title : Ajit Pawar | ajit pawar criticized sanjay gaikwad after statement on government employee
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ