अजित पवारांनी सर्व आमदारांच्या संमतीचे पत्र राज्यपालांना दिले आहे : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राजकीय भूकंप होऊन भाजपने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर शिवसेनेने टीकेची तोफ डागली होती. अजित पवार यांनी शरद पवारांना धोका दिल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर एक संभ्रमावस्था तयार झाली होती.

अजित पवार हे बंड करून राष्ट्रवादीतुन बाहेर पडले असा अंदाज व्यक्त केला जात होता. अशात भाजपच्या गिरीश महाजन यांनी अजित पवारांनी राज्यपालांकडे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचे संमतीपत्र दाखल केले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचा पाठींबा देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे समजते.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांनी युतीची वाट लावली, त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठीत खंजीर खुपसण्याबाबत शिकवू नहे असे विधान देखील गिरीश महाजन यांनी केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Visit : Policenama.com