पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी सोमवारी मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. पण या आंदोलकांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘संवेदनशीलता दाखवा’ असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांचे कान टोचले आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.
अजित पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “शिक्षकांच्या आंदोलनाची दखल तर घेतलीच नाही, पण उद्धव ठाकरे, दाराच्या उंबरठ्यावर आलेल्या शिक्षिकांची भेट घेऊन किमान मान राखायचा. विनाअनुदानित मराठी शाळांना अनुदानाची रक्कम मिळाली तर ती नवसंजीवनी ठरेल. त्यांच्या मागण्या ऐकण्या इतकी तरी संवेदनाशीलता दाखवा !” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
शिक्षकांच्या आंदोलनाची दखल तर घेतलीच नाही, पण @uddhavthackeray दाराच्या उंबरठ्यावर आलेल्या शिक्षिकांची भेट घेऊन किमान मान राखायचा. विनाअनुदानित मराठी शाळांना अनुदानाची रक्कम मिळाली तर ती नवसंजीवनी ठरेल.त्यांच्या मागण्या ऐकण्या इतकी तरी संवेदनाशीलता दाखवा!https://t.co/NYl668RQjc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 5, 2019