मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांना सांगितले की अजित पवार यांनी मुलाला म्हणजेच पार्थ पवारला संपर्क साधून सांगितले की राजकारणापेक्षा आपण शेती, व्यवसाय करु. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत यावर बोलताना स्पष्ट केले की मी मुलाला सांगितले की तू राजकारणापेक्षा आपल्या व्यवसायात, शेतीत लक्ष घालं. कारण मी अनुभवले की राजकारणात लोकांसाठी काम करताना अनेकदा कारण नसताना आपल्यावर टीका होते, बदनामी होते. त्यामुळे मी मुलाला हा सल्ला दिला.
आता मी सांगेल ते करायचे –
अजित पवार यांनी हे देखील स्पष्ट केले की शरद पवार साहेबांशी मला सांगितले की मी तुझे ऐकून घेतले आता यापुढे मी जे काही सांगेल ते तुला ऐकावे लागेल.
कालच्या राजकीय नाट्यानंतर आता अजित पवार यांनी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले, ते म्हणाले की शरद पवारांचा या बँक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, ज्या साहेबांमुळे मी इथपर्यंत पोहचलो. शिखर बँक प्रकरणात साहेबांचे कोणत्याही कारण नसताना नाव घेण्यात आले. माझ्यामुळे साहेबांची बदनामी होत आहे. या विचारातून मी साहेबांनाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला, त्यांना मी फोन बंद केला.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते, ज्यात जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगळ भुजबळ यांचा समावेश होता. या पत्रकार परिषदेत शरद पवार मात्र उपस्थित नव्हते.
Visit : Policenama.com
- बाळाला ‘अॅनिमिया’ होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- मद्य सेवनामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, आरोग्यासाठी हानिकारक
- ‘स्ट्रेच मार्क’ घालवण्यासाठी ‘हा’ आहे खास उपाय! महिला घरच्याघरी करू शकतात
- चष्मा घालवायचा असेल तर घ्या ‘हे’ पेय, डोळ्यांचे आरोग्य राहील उत्तम!गाजर खा आणि निरोगी रहा, ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे, जाणून घ्या
- शरीरात वेदना होतात का? तर वेदनाशामक गोळीऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय
- रोज एक कप ‘कॉफी’ घ्या…आणि वाढता तुमचे आयुष्यमान, जाणून घ्या अन्य फायदे